Powered By Blogger

मतभेद

पटले नाही
एकास दुसऱ्याचे
जमले नाही
एकमेकांचे

मतभेद झाले
तंटा पेटला
माझेच खरे
वाटले प्रत्येका

हौस नव्हती
लाखोली वाहिली
प्रतिक्रिया अशी
पश्चाताप करी

राग मनातला
पोचला दुसऱ्याला
घालून वळसा
त्यालाच टोचला

अखेरीस झाले
साध्य काय
खेद वगळून
काहीच न्हाय

तेव्हा पेटला
दिवा मनातला
सांगत आपल्यास
योग्य काय

प्रेमाचे शब्द
चालले असते
भांडण असे
झालेच नसते

विसरू नका
एक गोष्ट
प्रेमाची भाषा
हीच श्रेष्ठ !
*रोहितमुळे सुचलेल्या दोन कडव्यांचा संदर्भ देत सुचलेली कविता*