उषःकाल झाली. तांबडं फुटलं. पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली. अंधाराचा
अंत झाला. सकाळचं वातावरण काही आगळंच असतं. एक नवा दिवस म्हणजे जणू काही एक
नवीन जीवनच आहे, ज्याची सुरुवात होते उषःकालने. नवे चैतण्याचे प्रतीक
म्हणजे सकाळ. नव्या विचारांनी, नव्या संकल्पनेंनी, सकारात्मक मनाने सुरुवात
करण्यास प्रोत्साहन देते. रात्रीच्या काळोखाचा अंत होऊन जातो. कालच्या
घडामोडी विसरून जावा असे म्हणते. प्रकाश जसा अंधारावर मात करतो तसच आपणही
आपल्या अडचणींवर मात करू शकतो. असा संदेश सूर्योदय आपल्याला दररोज देत
असतो. याची जाण जर आपल्याला असेल तर आपण आपला दिवस सुदिन करू शकतो.
*दिशांतमुळे मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी सकाळी ऐकू आलेली पक्ष्यांची किलबिलाट*
