Powered By Blogger

कार्यक्रम

एखादा कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो. या कार्यक्रमाला बऱ्याच लोकांना बोलावण्यात आलेलं असतं. अर्थातच, तयारी करायला आपण ठरलेल्या स्थळी थोडं आगोदर जातो. तयारी झाली की पाहुण्यांची प्रतीक्षा सुरू.
काही वेळानं काही पाहुणे हजर झालेले असतात. त्यांच्याशी गप्पाटप्पा सुरू होतात. मग अजून चार पाहुणे आलेले दिसतात व त्यांचा स्वागत करायला आपण लगेच त्यांच्या जवळ जातो. आतापर्यंत जवळपास सगळे लोक आलेले असतात. पण अजून सगळे आलेत अस मनाला भासत नाही.
कोणीतरी अद्याप आलेलं नाही असा लक्षात येतं. मग आपण विचारात पडतो.... कोण आलेलं नाही? हा विचार आपल्याला शांत राहू देत नाही. फक्त एवढेच आले? असं वाटू लागतं.
मग लक्षात येतं! दीक्षित अजून आलेले नाहीत. कुठे असतील? का आले नसतील? विसरले तर नाहीत न? असे अजून दहा विचार मनात घर करून बसतात.
मग दारापाशी एक ओळखीचा चेहरा दिसतो, जे पाहून आपले हृदय नाचू लागते. दीक्षित आले! अंगात असा उत्साह भरून येतो; त्यांचे शुभागमन करायला आपण पळतच जातो जणू. मग लक्षात येतं, ज्यांची आपण तयारी झाल्यापासून प्रतीक्षा करत होतो ते हेच. दीक्षित आले म्हणजे सगळे आले! बाकी कोणीही आलं नसतं तरी चाललं असतं, पण दीक्षित मात्र हवेच.
मग दोन चार दिवसांनी जर कोणी असा प्रश्न केला, "कार्यक्रम कसा झाला? किती जण आलेले?"
तेव्हा आपण अगदी अभिमानाने उत्तरू, "सगळे आलेले!"
*सुम-साम दिवस अभिषेक नाही म्हणून, 'पाहुणे' हा शब्द ऐकला अन् विचार झाले सुरू*